समाजाचे प्रश्न हाताळणारे पत्रकार लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात, व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांचा सूर.

 आवाज परिवर्तनाचा न्युज नेटवर्क :-

 शिर्डी : समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी प्रेरक आहेत. संविधानाने प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेल आहे. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने बातमी देत असताना, सामाजिक जाणभान ठेवणे गरजेचे आहे. देशात आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व कायम टिकून आहे. असे मत व्हाईस ऑफ मिडियाच्या शिर्डी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं.

       व्हॉईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दि.३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात संपूर्ण राज्यभरातील पत्रकार सहभागी झाले होते.
        पहिल्या दिवशी पदाधिकाऱ्यांची मनोगते, संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त संपादकांची पुढारी न्युज नेटवर्कचे उपसंपादक प्रसन्न जोशी व आ. सत्यजित तांबे यांनी खुली मुलाखत घेतली. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, लेखक अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, तसेच सरिता कौशिक सहभागी होते.
   
       मिडीया विकली गेली आहे, हा नॅरेटिव्ह धोकादायक आहे. समाजाचे विषय हाताळणारे पत्रकार आज लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. पत्रकारांच्या मनात कोणतेही भीतीयुक्त वातावरण किंवा परिस्थिती निर्माण होणार नाही. याची काळजी समाजाने घेतली पाहिजे. कारण पत्रकार हा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतो.आज पत्रकारांना किती पगार मिळतो, त्याला किती पगार द्यावा याचं बंधन संस्था मालकांना नाही. पत्रकारांची प्रगती कशी होईल, विशेष कौशल्य प्राप्त व्हावी साठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले .     
         याबाबतीत आजची परिस्थिती चांगली नाही ती बदलणे गरजेचे आहे. आज पत्रकार दिवस- रात्र राबत असतात, त्यांना काय मिळत? हा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याचा उदरनिर्वाह कसा चालेल? त्याला कुणाकडे हात पसरावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. पत्रकारांनी सत्तेला प्रश्न विचारायचे असतात, स्वतःची क्रेडिटिबिलिटी ठेवायला पाहिजे, सडेतोड बोलणारे लोक समाजाला आवडतात. आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असताना पत्रकारांवर सामाजिक, राजकीय दबाव असल्याचे पाहायला मिळते. त्यांना ट्रोल केल्या जात, हे होणं चुकीच आहे. लोकशाहीसाठी घातक आहे. आपण जे काम करतोय ते बरोबर आहे ना? हे तपासल पाहिजे. पत्रकारांनी आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, चूक असेल तर माफी मागितली तरी काही हरकत नाही. असेही उद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

        सत्ता राबवीत असताना समानतेचे तत्व वापरायला हव. जेव्हा सरकारी संस्थांचा सिलेक्टिव पद्धतीने वापर केला जातो तेव्हा, लोकशाही धोक्यात असल्याची भावना निर्माण होते. अशी भावनाही यावेळी मान्यवरांनी बोलून दाखवली.

       यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे, भाजपा युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते, सहसचिव महसूल संजय इंगळे, उद्योजक राणा सूर्यवंशी अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments