माझी वसुंधरा अभियानांतर्गत चिनावल गावाने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक.

ग्रामपंचायतीला १ कोटी ७५ लाख या मूळ बक्षीसासह ५० लाखांचे अतिरिक्त बक्षीस. 
   लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन.
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क 
 चिनावल ता. रावेर :-
           माझी वसुंधरा ४ .०  अभियानांतर्गत चिनावल ता. रावेर ग्रामपंचायतला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून काल याबाबतची घोषणा संबंधित विभागाने केली.
      महाराष्ट्र शासनाने जल,अग्नी,वायू,आकाश पृथ्वी या पंचतत्वावर आधारित पर्यावरण पूरक, पर्यावरणाशी संबंधित वसुंधरा ग्राम अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. ग्रामपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती मधून माझी वसुंधरा ४.० या अभियानात चिनावल ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन गावात माझी वसुंधरा अभियानात राबविण्यात येणारे पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण विभाग, पर्यावरण मंत्रालय, जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली व यांनी दिलेल्या निकषावर आधारित पर्यावरण पूरक कार्य उत्कृष्टरित्या राबविले. व राज्यभरातील ग्रामपंचायती पैकी चिनावल ता. रावेर या ग्रामपंचायतीने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कालच शासनाने जाहीर केले की, चिनावल ग्रामपंचायतीला १ कोटी ७५ लाख व अभियानात सातत्य ठेवत ध्यास घेऊन माझी वसुंधरा अभियान उत्कृष्टरित्या राबविले. त्याबद्दल हे पारितोषिक देत आहेत. 
       येथील लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव, उपसरपंच सौ शाहिन बी शे जाबीर,ग्रामविकास अधिकारी कैलास भगत व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामस्थांना सहभागी करून पर्यावरण पूरक व माझी वसुंधरा अभियानाला अनुसरून उत्कृष्ट असे कार्य केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून चिनावल ग्रामपंचायत ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांचे कौतुक होत आहे.
         लवकरच हे पारितोषिक सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व सन्मान मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री, पर्यावरण मंत्रालय अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे.
           माझी वसुंधरा ४.० या अभियानात चिनावल ग्रामपंचायतीने गेल्या ९ महिन्यात सोलर प्लॅन, कंपोस्ट खत, ग्राम स्वच्छता,वृक्ष लागवड,जल पुनर्भरण, कुटुंब कल्याण, पर्यावरण साक्षरता जनजागृती या पंचतत्वावर आधारित उपक्रम उत्कृष्ट व नियोजन बद्ध रित्या राबवत यात सातत्य ठेवले व राज्य भरात या अभियानात जोरदार उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने संबंधित विभागाने यांची दखल घेत ग्रामीण माझी वसुंधरा मध्ये थेट राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक देऊन गौरव केला आहे. तर अभियानात सातत्य ठेवून उंच उडी घेत प्रथम क्रमांक मिळवल्याने या १ कोटी ७५ लाखा सोबत ५० लाखांचे अतिरिक्त बक्षीस सुद्धा जाहीर झाले आहे.

     या बाबतीत कालच संबंधित विभागाने या बाबतीत घोषणा करुन संबंधित चिनावल ग्रामपंचायतला या बाबत ची माहिती प्राप्त झाली आहे. या साठी सरपंच सौ ज्योती संजय भालेराव, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान या आधी ही चिनावल ग्रामपंचायत ला माझी वसुंधरा चे राज्यस्तरीय तृतीय क्रमांक चे ५० लाखांचे बक्षीस मिळाले होते. आज पुन्हा माझी वसुंधरा ४ .० चे बक्षीस जाहीर झाल्याने गावात आनंद व्यक्त केला जात असून सरपंच सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दरम्यान या साठी सर्व ग्रामस्थ, संजय भालेराव सर, चंद्रकांत भंगाळे व सदस्यांचा मोठा सिंह चा वाटा आहे. दरम्यान सरपंच सौ ज्योती भालेराव उपसरपंच शाहिन बी व सर्व सदस्यांनी या बाबत आनंद व्यक्त करून जळगाव जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अभियानात सहकार्य करणारे कर्मचारी वृंद, रावेर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी व कर्मचारी यांचे सह ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.
     चिनावल ग्रामपंचायत चा वसुंधरा ४.0 स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक येणे.व २.२५कोटीं चे बक्षीस जिंकणे आमच्या गावासाठी तसेच आमच्या ग्रामपंचायत साठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. आम्ही पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी या पंच तत्त्वावर आधारीत गावात चांगली कामे केली. याचे श्रेय आमचे सदस्य, कर्मचारी, ग्राम विकास अधिकारी, व गावकरी यांना जाते. यापुढे सुद्धा अशीच उल्लेखनीय कामगिरी गावाच्या विकासासाठी करत राहणार अशी ग्वाही आपणास देते.
          सौ. ज्योती संजय भालेराव 
               लोकनियुक्त सरपंच 
         ग्रामपंचायत चिनावल ता. रावेर 

0/Post a Comment/Comments